728X90

728X90

0

0

0

विषयांवर चला

[shortcode_change_breadcrumb]
दम्यासोबत गणेश चतुर्थीला काळजी घेत असा घ्या आनंद
10556

दम्यासोबत गणेश चतुर्थीला काळजी घेत असा घ्या आनंद

भारत हा विविधतेचा देश आहे आणि भारतात जेवढे सण साजरे केले जातात ते इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अतुलनीय आहेत.

     

गणेश चतुर्थीचा आनंद लुटताना भाविक

भारत हा विविधतेचा देश आहे आणि भारतात जेवढे सण साजरे केले जातात ते इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अतुलनीय आहेत. अश्याच प्रकारे गणेश चतुर्थी हा सन भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांत हा सण येतो.

गणेश चतुर्थीला अनेक उपासक किंवा भाविक दहा दिवस गणपतीची मूर्ती घरी (मातीच्या छोट्या मूर्ती) घेऊन येतात. त्या दहा दिवसांत गणरायाची मनोभावे पूजा करतात या कालावधीत लोक नातेवाईकांना, जवळच्या सार्वजनिक गणेशमूर्तींना भेट देतात. तसेच भाविक आध्यात्मिक गीते ऐकतात आणि फुले, मोदक, दूर्वा इत्यादी अर्पण करतात. प्रत्येक दिवसाची सांगता गणपती, इतर देवता आणि संतांच्या सन्मानार्थ आरती गाऊन होते. संपूर्ण भारतात गणेशोत्सव साजरा केला जात असला तरी सर्वाधिक उत्साह महाराष्ट्र राज्यात दिसून येतो.

या उत्सवादरम्यान भाविकांकडून आनंद व्यक्त करण्यासाठी फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे  कॅडमियम, सोडियम, पारा, नायट्रेट, बेरियम आणि नायट्रेट सारखे हानिकारक वायू आणि विषारी पदार्थ वातावरणात सोडले जातात. ज्यामुळे याकाळात वायू प्रदूषणाची पातळी वाढते आणि  फटाक्यांपासून होणारे वायू प्रदूषण आणि धार्मिक विधींसाठी साहित्य जाळणे यामुळे दमा,खोकला, स्वसनाशी संबधित आजार आणि फुफ्फुसांशी संबंधित इतर समस्यांसारख्या श्वसनाच्या स्थिती बिघडू शकतात. फुफ्फुसांना सतत वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्याचा सर्वाधिक परिणाम होतो, असे मॅक्स हेल्थकेअर, नवी दिल्लीचे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ज्ञ, सहयोगी संचालक डॉ. राहुल चांदोला सांगतात. सिगारेटच्या धुरापेक्षा ते जास्त हानिकारक आहे, असे डॉ. चांदोला सांगतात.

जगभरात हवा प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालात सांगितल्याप्रमाणे हवा प्रदूषणाच्या समस्येचा दक्षिण आशियातील जनतेतील आयुर्मानावर गंभीर परिणाम झाला आहे. हवा प्रदूषणामुळे त्यांचे आयुष्य ५.१ वर्षांनी कमी झाले आहे. त्यामध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ व पाकिस्तानसारख्या देशांतील लोकांचा समावेश आहे.

तुम्हाला देखील दमा आहे आणि बाहेर जाण्यासाठी घाबरताय? काळजी करू नका तज्ञ तुम्हाला काही टिप्स देत आहे त्या वापरून तुम्ही बिनधास्त गणेश चतुर्थी साजरी करू शकता.

चला तर मग पाहूया गणेश चतुर्थी दरम्यान कोणत्याही आजाराला बळी पडू नये यासाठी आपण आपले आरोग्य कसे पाळू शकतो आणि प्रदूषणापासून कसे दूर राहू शकतो.

गणेश चतुर्थी दरम्यान दम्यापासून सुरक्षित राहण्यासाठी टिप्स

माहिती मिळवा: उत्सवादरम्यान तुमच्या भागातील प्रदूषण पातळीबद्दल जागरूक रहा. अपडेट राहण्यासाठी तुम्ही हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणारे अॅप्स किंवा वेबसाइट वापरू शकता.

मास्क वापरा: तुम्ही गणेश चतुर्थी दरम्यान बाहेर असता तेव्हा मास्क घाला, विशेषत: जर तुम्ही जास्त गर्दीच्या ठिकाणी किंवा इतर प्रदूषण असलेल्या भागात असाल तर N95 मास्क वापरा.

हायड्रेटेड राहा: भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. हे तुमचे श्वसनमार्ग ओलसर ठेवू शकते, जे प्रदूषकांपासून काही संरक्षण प्रदान करू शकते.

अँटिऑक्सिडंट-समृद्ध अन्नाचे सेवन करा: हिरव्या पालेभाज्या,बीट, ब्रोकोली, रताळे,गाजर, ग्रीन टी, कॉफी,अक्रोड, पेकान, चेस्टनट सारखा सुका मेवा, स्ट्रॉबेरी, गुजबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी यांसारखे अँटिऑक्सिडंट समृध्द अन्न  तुमच्या शरीराला प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांचा सामना करण्यास मदत करू शकतात.

एअर प्युरिफायर वापरा: तुमच्याकडे एअर प्युरिफायर असल्यास, घरातील वायू प्रदूषण कमी करण्यात मदत करण्यासाठी ते घरामध्ये वापरा.

विशेष आहार: तुम्हाला आहाराच्या विषयी लक्ष देण्याची गरज आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अधिक तेल, मिठाई असलेल्या आहाराच्या पदार्थांचा उपयोग कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुप, दाण्यांच्या तेलांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा.

औषधोपचार: आपल्या कडे दम्याची औषधे आहेत याची खात्री करा आणि आपल्या डॉक्टरांनी सल्ल्यानुसार टी औषधे वेळेवर घ्या. कोणतेही डोस सोडू नका आणि आपले बचाव इनहेलर नेहमीच आपल्याबरोबर ठेवा.

विश्रांती घ्या आणि आनंद घ्या: उत्सवाचा आनंद घ्या. अधिक तणाव आणि चिंता यामुळे देखील दमा वाढू शकतो, म्हणून शांत रहा आणि आपल्या प्रियजनांसह आनंद साजरा करण्यावर लक्ष केंद्रित करा.

लक्षात ठेवा, गणेश चतुर्थी सारख्या सणांमध्ये तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैयक्तिक जागरुकता आणि जबाबदार निवडी यांचा मिलाफ आवश्यक आहे. जागरूक राहून, सक्रिय राहून आणि आरोग्यदायी सवयी लावून तुम्ही आनंदी गणेश चतुर्थी साजरी करू शकता.

 

तुमचा अनुभव/कमेंट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0

0

0

ट्रेडिंग

लेख

लेख
भारत हा विविधतेचा देश आहे आणि भारतात जेवढे सण साजरे केले जातात ते इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अतुलनीय आहेत.
Video
हा नैवद्य म्हणून गणरायाला जितका प्रिय आहे तितकाच हा प्रसाद म्हणून आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.
लेख
पावसाळ्यात डेंग्यूचा ताप हा चिंतेचा विषय असतो. जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली नाही तर हा आजार खूप गंभीर असू शकतो.

Opt-in To Our Daily Newsletter

* Please check your Spam folder for the Opt-in confirmation mail

Opt-in To Our
Daily Newsletter

We use cookies to customize your user experience, view our policy here

तुमची प्रतिक्रिया यशस्वीरित्या सबमिट केली गेली

हॅपीएस्ट हेल्थ टीम तुमच्याकडे लवकरात लवकर परत येईल.